स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हजारो अमळनेरकरांनी घेतली सामूहिकरीत्या शपथ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशाच्या स्वातंत्र्याचे  ७५ वर्ष साजरे करण्यात येत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने अमळनेरच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी हजारो नागरिकांनी पर्यावरण संरक्षणची सामूहिक शपथ घेतली.

 

देशात स्वातंत्र्याचे ७५ वर्ष विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. ही शपथ तिरंगा चौकात घेण्यात आली.  याप्रसंगी तिरंगा चौक गर्दीने फुलून गेला होता. यावेळी शासकीय, निमशासकीय, विविध शाळा, सामाजिक संस्था, महाविद्यालये तसेच सर्वसामान्य लोक समुदाय यांच्यासह सुमारे दहा हजार नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

Protected Content