सोशल मिडिया सोडल्यास मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील : संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

 

आपण सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या विचारात असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच भूकंप झाला. याबद्दल रविवारी बोलू असे मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे मोदी रविवारी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियासंदर्भात जो निर्णय घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचे नेते सांगत असतात की सोशल मीडियातील योद्धे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. सरसेनापतीच सोडून जात असेल, योध्यांनी काय करायचे? सोशल मीडियाचा गैरवापर वाढला आहे. पण, मोदींनी सोशल मीडिया सोडून नये. त्यांना फॉलो करणारे सोशल मीडियातील त्यांचे चाहते अनाथ होतील, असे संजय राऊत म्हणाले.

Protected Content