साधेपणाने साजरा होणार महाराष्ट्र दिन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे यंदा राज्यातील महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले असून यानुसार जिल्ह्यात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक १ मे, २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी कळविले आहे. यात सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात येणार आहे.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच उपस्थित रहावे असेही परिपत्रकामध्ये नमुद आहे. सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास इतर अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात येवू नये, असेही कदम यांनी कळविले आहे.

Protected Content