शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भामलवाडी येथील ४० वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

या बाबत वृत्त असे की भामलवाडी ता. रावेर येथील शेतकरी विजय पाटील (वय ४०) यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत विजय पाटील यांना दोन मुले, पत्नी,आई असून गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत निंभोरा पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे. कर्जबाजारीला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Protected Content