विलास चौधरी हत्याकांडातील आरोपी पकडले

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवाशी विलास चौधरी यांना मारहाण करून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती . या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. कॉ विकास सातदिवे यांना गुप्त खबऱ्यांनी हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक खबर दिल्यांनंतर सापळा रचून त्यांना वांजोळा रोड भागातून अटक करण्यात आली . अक्षय न्हावकर ( रा – चक्रधर नगर ), आकाश पाटील ( नारायनानगर ) आणि अभिषेक शर्मा ( चमेली नगर ) अशी या आरोपींची नवे आहेत . त्यांना काल सकाळी सहा वाजता अटक करण्यात आली.

पो. नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो . नि. अनिल मोरे , पो हे. कॉ . सुनील जोशी पो ना. रमण सुराडकर , किशोर महाजन , समाधान पाटील , रवींद्र बिर्हाडे , महेश चौधरी , पो . कॉ विकास सातदिवे , प्रशांत परदेशी , कृष्ण देशमुख , अय्याज खान यांच्या पथकाने हा सापळा रचला होता .

Protected Content