विधान परिषदेवर मुख्यमंत्र्यांसह आठही उमेदवारांची बिनविरोध निवड

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.

 

विधान परिषदेसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ नंतर संपली. त्यानंतर अधिकृत निकाल घोषित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Protected Content