वरळीत भीषण अपघात ; तीन जण जागीच ठार !

मुंबई (वृत्तसंस्था) वरळीतील खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

चालक महिला नमिता चांद (वय ३९ ) अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भावना बांथिया (६१), जूही गुरनानी (५२) आणि सहा महिन्याची निषिकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. बीएमडब्ल्यू गाडी चालवत असलेल्या महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर गाडी रस्तादुभाजकाला (डिव्हायडरला) धडकली. या अपघातात गाडी चालवणारी महिला सोडून इतर तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. चालक महिला मूळ पुण्याची असून वरळीला आईच्या घरी आली होती. बाहेर जात असताना तिच्यासोबत गाडीमध्ये तिची सहा महिन्यांची मुलगी, आई आणि एक नातेवाईक असे चार जण होते.

Protected Content