लवून नमस्कार करण्यास नकार ; उत्तर प्रदेशात दलित सरपंचाची हत्या

लखनऊ (वृत्तसंस्था) ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिल्याच्या रागातून उत्तर प्रदेशात एका दलित सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

 

उत्तर प्रदेशातील आझमगढमधील बांसगावमध्ये ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिला म्हणून सत्यमेव जयते यांची हत्या करण्यात आली. सत्यमेव जयते हे हत्या झाली त्यादिवशी गावाबाहेर असलेल्या एका खासगी शाळेसमोरून जात होते. त्याचवेळी त्यांना त्यांचे मित्र विवेक सिंह आणि सूर्यांश दुबे हे जेवणासाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सत्यमेव जयते यांची त्यांच्या मित्रांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर आरोपींनीच सत्यमेव यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि फरार झाले. या घटनेचे गावात पडसाद उमटले. संतप्त जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली. त्याचबरोबर पोलीस चौकीचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान, १३ वर्षीय दलित मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत असताना पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे.

 

Protected Content