लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेला छळ करत पाच लाखाची मागणी केली. पैसे आणले नाही तर फाशी देवून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शहापूर येथील माहेर आलेल्या विवाहिता मनिषा अतुल पाटील (वय-२५) यांचा विवाह पाळधी ता. जामनेर येथील अतुल एकनाथ पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेच्या आईवडीलांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही. चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. यावरून विवाहितेला शिवीगाळ करून गांजपाठ केला. दरम्यान, पतीच्या बादलीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे अशी मागणी केली. पैसे आणले नाही तर तुला फाशी लावून मारून टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान, या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात पती अतुल एकनाथ पाटील, एकनाथ रामकृष्ण पाटील, अलकाबाई एकनाथ पाटील, पल्लवी विशाल पाटील सर्व रा. पाळधी ता. जामनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहे.

Protected Content