लग्नाचे आमिष देत विवाहिेतेला पळवुन केला अत्याचार

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेस तरूणाने लग्नाचे आमीष देत पळवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही विवाहिता आहे. ती पती व दोन मुलांसह राहते. तर त्याच परिसरात राहणारा आकश दिनेश जाधव (वय २१) याचे विवाहितेसोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. आकाश याने विवाहितेस लग्नाचे आमीष दिले होते. तसेच तो वारंवार तीच्यावर अत्याचार करीत होता. दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी या तरुणाने विवाहितेस मांजरी (चंद्रपुर) येथे पळवून नेले. तेथे २५ नोव्हेंबरपर्यंत तीच्यावर अत्याचार केला. यानंतर २६ नोव्हेंबर रोजी रेल्वेने भुसावळ व तेथुन रिक्षेने जळगावात आणून सोडले. ती विवाहिता रिक्षाने टॉवर चौकात आल्यानंतर तीने तिच्या आईला फोन लावला. तिची आई याठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपुर्ण हकिकत आईला सांगितली. दरम्यान शहर पोलिसात ती विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल असल्याने मंगळवारी ति विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून आकाश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहे.

Protected Content