खा. उन्मेष पाटलांनी घेतली रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | खासदार उन्मेश पाटील यांनी  दोंडाईचा मुंबई एक्सप्रेस,पाळधी जळगाव पर्यंत करण्या बाबत व विविध गाड्यांच्या थांबा  संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून त्यांना इतर मागण्यांचे निवेदन दिले.

 

धरणगाव रेल्वे सल्लागार समिती व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व DRUCC मेंबर व तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत  खा. उन्मेश दादा पाटील यांनी विविध गाड्यांना थांबा देण्याविषयी  केंद्रीय रेल्वेमंत्री  ना. अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने दोंडाईचा मुंबई एक्सप्रेसला(09051/52) पुढे पाळधी / जळगाव पर्यंत करणे. धरणगाव येथे ताप्ती गंगा एक्सप्रेस(19045/46) ला थांबा मिळणे. खान्देश एक्सप्रेस(19003/04) नियमित( दररोज) सुरू करणे व पुढे पुणे पर्यंत Extend करणेबाबत( वाया वसई रोड कल्याण कर्जत लोणावळा पुणे ). तसेच प्रेरणा एक्सप्रेसला(22137/38) अमळनेर येथे थांबा मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या.

 

Protected Content