रावेर-चोरवड महामार्गाची दुर्दशा ; खड्डे बुजविण्याची मागणी

 

रावेर, प्रतिनिधी ।  रावेर -चोरवड दरम्यान अंकलेश्वर महामार्गाची दुर्दशा झाली आहे. या महामार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचलकांमध्ये नाराजी पसरली असून लवकरात लवकर महामार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गवर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते व खड्डा चूकविण्याच्या नादात अपघात देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले जातील यासाठी संबधित ठेकेदाराला पत्र दिले असल्याचे महामार्गाचे काम बघणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. जे. महाजन यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.

Protected Content