रावेरात बापाला अटक झाल्याने मुलाची आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना येथे घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

रावेर येथील कुंभारवाड्यातील प्रकाश सिताराम प्रजापती यांच्या घरातून ३४ हजार ५०० रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचा शिक्का आणि पाच हजार रोख असा ३९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना ५ मार्चला उघडकीस आली होती. या प्रकरणात रवींद्र नारायण कुंभार याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर सायंकाळी ५.५० वाजता रवींद्र पाटील यांचा मुलगा मनोज रवींद्र प्रजापती (कुंभार) (वय २०) याने, बदनामीच्या भीतीने रावेर रेल्वेगेटजवळ बर्‍हाणपूरकडे जाणार्‍या रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी भुसावळ जीआरपीत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Protected Content