राज्यात लॉकडाऊनची मर्यादा ३१ मे पर्यंत वाढणार

मुंबई प्रतिनिधी । राज्यात लॉकडाऊनला मुदतवाढ मिळणार असून ३१ मे पर्यंत याची मुदत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करतांना लॉकडाऊन ४.० अनिवार्य असल्याची घोषणा केली होती. १८ मे च्या आधी याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. या अनुषंगाने राज्य सरकारतर्फे लवकरच लॉकडाऊनला मुदतवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवू शकते अशी माहिती समोर आलेली आहे. याबाबत लवकरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

Protected Content