राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण नाही : आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी टोपे म्हणाले, आम्ही या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सतर्क आहोत. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तयार केले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात १० अतिरिक्त बेड लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनावर कुठल्याही प्रकारचे औषध निर्माण झालेले नाही. त्यामुळे, आधीच उपाययोजना केल्यास योग्य ठरेल,असेही टोपे यांनी सांगीतले. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 पर्यंत पोहोचली असल्याचे आज सांगितले.

Protected Content