राज्यातील शासकीय कार्यालये सात दिवस बंद राहणार

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील शासकीय कार्यालये सात दिवस बंद राहणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात आता राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, यातून मात्र अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेले आहे.

Protected Content