‘राजगृह’ तोडफोड म्हणजे आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला ; राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्थ) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेलं ‘राजगृह’ इथे दोन अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री हल्ला केला. निवसस्थानाची तोडफोड केली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती. सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. तर मुंडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. @AnilDeshmukhNCP यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी ! जय भीम !, असे ट्वीट केले आहे.

Protected Content