यावल तालुक्यातील निराधार वर्षभरापासून शासन अनुदानाच्या प्रतीक्षेत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील गोरगरीब, विधवा व वृद्धांना देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून ज्या गरजू लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, असे लाभार्थी गेल्या वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, आता या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना याचा लाभ कधी मिळणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

यावल तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार समिती गठीत असुन या समितीव्दारे राज्य शासनाच्या सामाजीक व न्याय विभागाच्या माध्यमातुन विधवा, निराधार, वयोवृद्ध जेष्ठ नागरीक, इंदीरा गांधी भुमीहीन अशा घटकांना प्रतिमाह एक हजार मदत दिली जाते. मागील वर्षाच्या ऑगस्ट महीन्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने बैठकीत सुमारे चार शे प्रस्ताव मंजुर करण्यात आली असुन या सर्व लाभार्थ्यांना तसे पत्र देखील प्राप्त झाले आहे.

मात्र असे असतांना मागील एक वर्षापासुन त्यांच्या खात्यात अनुदान कधी पडेल या प्रतिक्षेत आहे. जिल्हाधिकारी यांनी संदर्भात पाठपुरावा करून प्रस्ताव मंजुर झालेले वयोवृद्ध जेष्ठ नागरीक, विधवा निराधार, इंदीरा गांधी भुमीहीन गोरगरीब लाभार्थ्याना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Protected Content