मोदी देशाला उद्ध्वस्त करताय ; राहुल गांधींचा हल्लाबोल !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. मोदी देशाला उद्ध्वस्त करताय, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला आहे.

 

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत. पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केले आहे. हे भ्रम लवकर तुटणार आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे. सरकारने संसदीय समितीला माहिती देताना १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली आहे. या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली असून, “मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोप केला आहे.

Protected Content