मोदींच्या निर्णयावर कोर्टाचे शिक्कामोर्तब : ना. गिरीश महाजन

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या निकालाचे विविध नेत्यांनी स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा स्वागत केलं आहे.

या संदर्भात ना. गिरीश महाजन म्हणाले की, आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांना आधार मिळाला पाहिजे, काही लोक असे आहेत ज्यांना जातीचे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांचा आर्थिक स्थर वाढवा म्हणून हा निर्णय योग्य आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मोदींनी जो निर्णय घेतला होता, त्याला त्यावर आज कोर्टाने शिक्कामोर्तब केले असे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले आहे.

Protected Content