मोटार सायकल अपघात; मध्यस्थीव्दारे ३२ लाखाची तडजोड

जळगाव प्रतिनिधी । समोरासमोर दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. ही घटना दीडवर्षांपुर्वी घडली होती. नुकसान भरपाई मिळावी यासाठी खटला न्यायाप्रविष्ठ होता. जिल्हा विधी प्राधिकणाच्या माध्यमातून मोटार अपघात मध्यस्थीव्दारे ३२ लाखाची तडजोड करण्यात आले आहे.

वृत्त असे की, मयत दिलीप आत्माराम चौधरी रा. भुसावळ यांचा ९ डिसेंबर २०१८ रोजी फैजपूर ते भुसावळ रोडवरील बामणोद गावाजवळ दुचाकीने जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान मयत हा भाजीविक्रेता होता. त्यांच्या वारसदारांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचे काम न्यायाधिश डॉ. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात प्रलंबित होते.

दरम्यान, २६ मे २०२० रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे मध्यस्थी करीता पाठविण्यात आले होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्या. एस.डी.जगमलानी यांनी मध्यस्थी अडवून नुकसान भरपाई पोटी ३२ लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहे. आयसीआयसीआय विमा कंपनीतर्फे ॲड. अनिल चौघुले यांनी तर मयतातर्फे ॲड. एम.एस.चौधरी यांनी कामाकाज पाहिले तर तडजोडीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज अद्यापपर्यंत पुर्णपणे सुरू झालेले नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तडजोड पात्र प्रकरणे, दावे खटल्यांमध्ये तडजोडी करण्याच्या प्रयत्नाकरीता मुभा देण्यात आली आहे. याच अनुषंगाने वरील तडजोडी पात्र खटला न्यायालयात सादर केला होता.

Protected Content