मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपयशी करण्याचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी प्रयत्न करतेय : चंद्रकांत पाटील

पुणे (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच स्थापन झाले, मात्र आता या सरकारमध्ये त्यांचे ऐकले जात नाही. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपयशी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपयशी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष प्रयत्न करत आहेत. अगदी शरद पवार यांचेही ऐकले जात नाहीय. तसेच कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराच्या वेळी राज्यात सर्व गोंधळच सुरु आहे. पुण्यात अर्ध्या तासात अहवाल येणारी कोरोना चाचणी आली. मग ती संपूर्ण राज्यात का नाही आली? कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यावर लक्षणं नसलेल्याला घरी ठेवायचे की रुग्णालयात हेही निश्चित नाही. लक्षणं नसलेल्या व्यक्तीला घरी ठेऊन उपचार केले तर लक्षणं असलेल्या रुग्णाला जागा मिळेल. मात्र, सगळा गोंधळ सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content