मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताय ; सुशांतच्या वडिलांचा गंभीर आरोप

पटना (वृत्तसंस्था) सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

 

सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचे प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केले आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी नोंदवली होती असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

Protected Content