मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्कफोर्स नेमणार : अमित देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड -१९ विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

 

अमित देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्याधिकाऱ्याना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत काळविन्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत. कोविड -१९ नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करेल. तसेच टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

Protected Content