महाराष्ट्रात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी वाहतुकीला संमती

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय होताच परिवहन आयुक्तालयाने बससाठी मानक कार्यपद्धतीही जाहीर केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणं हे खासगी वाहतुकीसाठी सक्तीचं असणार आहे. महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २० (१) मधील तरतुदीनुसार वाहनाच्या प्रत्येक चालकाने वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणं बंधनकारक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक किंवा प्रवासी गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांचीही वेळोवेळी स्वच्छता करावी. या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं, सॅनेटायझर वापरणं आवश्यक, बस उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी न होऊ देण्याची काळजी घेणं आवश्यक

बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीस ताप, सर्दी-खोकला इत्यादी कोविडची लक्षणं दिसत असल्यास त्या प्रवाशास बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करावा

चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधन गृहाचा वापर यासाठी बस थांबवल्यास त्या थांब्यावरीरल ही सर्व ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी

बससमध्ये चढताना आणि उतरताना तसेच खानपान व प्रसाधनगृहाच्या वापरासाठी उतरताना प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे प्रवाशांनी बसमध्ये कोणताही कचरा फेकू नये, कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचाच वापर करावा बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क बंधनकारक, सॅनेटायझरही सक्तीचे आहे . कोरोना वाहतूक नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे . या सगळ्या नियम आणि अटींसह १०० टक्के प्रवासी क्षमतेने खासगी वाहतुकीस संमती देण्यात आली आहे.

Protected Content