मनाने पराभूत ममता बॅनर्जी, विजयदेखील पचवता यायला हवा – आ. फुंडकर (व्हिडीओ)

खामगाव प्रतिनिधी । विजयी होऊनही मनाने पराभूत ममता बॅनर्जींना सांगावेसे वाटते की, विजय देखील पचवता यायला हवा. तो पचवता येत नसेल तर विजयाचा उन्माद हा लोकशाहीची हत्या करणारा ठरतो, अशी भूमिका आज भाजपच्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना आमदार आकाश फुंडकर यांनी मांडली.

पश्चीम बंगालच्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासोबत संपुर्ण देश खंबीरपणे उभा आहे.नुकत्याच झालेल्या  निवडणुकीत ममता बॅनर्जीचा पक्ष  सर्वात जास्त उमेदवार निवडुण येऊन पुन्हा सत्तेत आला आहे.  परंतु या विजयाची मस्ती टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या अंगात आली असून निकाल लागल्यापासून पश्चीम बंगाल येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या गेल्या, सामुहिक बलात्कार सुरु आहेत. भाजपा कार्यालयांची जाळपोळ सुरु आहे. त्यामुळे  आज पश्चीम बंगाल येथे सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे संपुर्ण देशात धरणे आंदोलन व निषेध  करण्यात येत आहे.

 

पश्चीम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्यावर तसेच ज्या वक्ती भाजपासमर्थक आहेत किंवा भाजपाचे मतदार आहेत अशा व्यक्तींवर त्यांच्या घरांवर व मालमत्तांवर हल्ले करुन मारहाण, लुटपाट हत्या , बलात्कारांचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसात 20 कार्यकर्ते व भाजप समर्थक नागरीकांच्या हत्या केल्या गेल्या  त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची हत्या असून या देशाचा नागरीक हा कोणत्याही पक्षाचा समर्थक किंवा मतदार असू शकतो.  तो त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु आज पश्चीम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळविलेले यश पाहून मनाने हरलेल्या ममता बॅनर्जी यांचा तोट सुटला असून त्यांचे कार्यकर्ते  संपुर्ण पश्चीम बंगालमध्ये हिंसाचार पसरवून दहशत ‍ निर्माण करीत आहे.असेही आमदार फुंडकर म्हणाले

 

या घटनेचा निषेध संपुर्ण देशातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत असून देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पश्चीम बंगालच्या  भाजपा पदाधिकारी व भाजप समर्थीत जनतेच्या पाठीशीखंबीर पणे उभे आहेत. वेळ आली तर संपुर्ण देशातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते  पश्चीम बंगाल येथे जाण्यास तयार आहे.      ममता बॅनर्जींना वाघीण संबोधणारे नेते महाराष्ट्रातील नेते  आज या हिसाचाराबददल मौन का ?   प्रत्येक गोष्टीवर मेणबत्या घेऊन हिंडणारे मोर्चे काढणारे आज पश्चीम बंगालमध्ये हिंसाचार माजलेला असतांना गप्प का आहेत ? असा सवालही आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी ‍ विचारला

Protected Content