मनसुख हिरेन हत्याकांडात : डॉक्टर, पोलीस, नेते सर्वांची चौकशी करावी; भाजपाची मागणी

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन मृत्यू तपास करताना आता भाजपाने  सर्व व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज सखोल चौकशीची मागणी  एनआयएकडे केल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेलार यांनी  केला.

 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून त्याचं शवविच्छेदन होईपर्यंत अनेक ठिकाणी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शेलार यांनी केला. तपास एनआयएकडे देण्यात आल्यानंतर आपण एनआयएला पत्र पाठवल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. डॉक्टर, लेबोरेट्रीमधील तज्ज्ञ, पोलीस, निर्देश देणारे राजकारणी, नेते सर्वांची चौकशी करावी अशी मागणी केल्याचं शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.

 

एटीएसने ठाणे न्यायालयाच्या निर्देशानंतर एनआयएकडे कागदपत्र आणि पुरावे पाठवले आहेत   प्रश्न असा आहे की राज्य सरकार ही मनसुख हिरेन यांच्या खुनाची केस स्वत:कडे का ठेऊ पाहत आहे?,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.   राज्य सरकार, मंत्री आणि नेत्यांच्या निर्देशानुसार मोठं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यात फेरफार करणे, चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न राज्य सरकाराने चालवल्याचा आरोपही शेलार यांनी  केला.

 

शेलार यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून ते अगदी शवविच्छेदनापर्यंत अनेक ठिकाणी कशाप्रकारे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामध्ये हिरेन यांच्या शरीरावरील रुमालांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसणे, गरज नसणाऱ्या चाचण्या करणे, एटीएसच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे असे अनेक प्रकार घडल्याचा दावा केलाय. या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करुन हे निर्देष देणारे नेते आणि राजकारणी कोण होते याचा एनआयएने शोध घ्यावा अशी मागणी शेलार यांनी केलीय.

Protected Content