भुसावळ शहर तीन दिवस बंद ही अफवाच : सचिन चौधरी

भुसावळ, प्रतिनिधी । शासनाने या आधीच लाॅक डाऊन ३ मे पर्यंत केलेले असतांना भुसावळ शहर तीन दिवस बंद ही अफवा पसरवली जात असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनी केला आहे.

भुसावळ शहर तीन दिवस प्रशासनाने बंद केलेले नसून स्थानिक लोकप्रतिनिधींचा आडमुठेपणा करण्यात येत आहे. दि. १ ते ५ मे केसरी कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. या काळामध्ये भुसावळ शहर बंद केले तर ३ मे नंतर शहरात रेशन दुकानांवरती गर्दी होणार आहे. याला जबाबदार कोण राहील ? असा प्रश्न श्री. चौधरी यांनी उपस्थित करत त्यासाठीच आजपासून रेशन धान्य दुकानावरती नागरिकांची थर्मल टेस्टिंग करून धान्य वाटप करण्यात येत असल्याचे सभापती चौधरी यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक रवींद्र सपकाळे , नगरसेवक दुर्गेश ठाकुर , राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे , अब्बास शहा आदी उपस्थित होते.

Protected Content