भुसावळात तरुणावर तलवार हल्ला; बंद केलेल्या भागाची काठी काढल्याचा राग

भुसावळ :- कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे.या पाश्वभूमीवर शहरात स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी गल्लीबोळांना बंद करण्यात आले होते.या भागातील रहिवाशी हे शौचालयाकडे जात असतांना बंद केलेल्या भागाची काठी काढल्याचा राग आल्याने तलवार हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात धावपळ झाली.

अधिक माहिती अशी की, जुना सातारा भागातील रहिवाशी कन्हैय्या सिताराम भोई (वय 25) हे रात्री 8:30 वाजेच्या सुमारास शैचालयासाठी जात असतांना त्या भागातील बंद केलेल्या भागाची काठी काढल्याचा राग आल्याने या भागातील रहिवाशी गोविंदा महाजन व गोलू ,काल्या तसेच त्यांचे दोन साथीदार असे पाच जणांना मिळून तलवार हल्ला केल्याची माहिती मुलाची आई शकुंतला सिताराम भोई यांनी दिली. दोन दिवसांपासून दोघे परिवरामध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेवटी तो वाद विकोपाला गेला व कन्हैया भोई हातात लाकडी काठी घेऊन मारण्यास गेला असता त्याच्यावर पाच जणांना तलवार हल्ला केल्याची घटना रात्री घडली असून भोई यांच्या घरासमोर रस्त्यावर रक्त पडलेले होते.जखमीला गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.या घटनेची शहर पोलीस स्टेशनला संकलनासाठी गेले असता अद्यावत कुठलीही नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्याने दिली.

Protected Content