भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीयांची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली.

 

 

गलवानच्या खोऱ्यात सोमवारी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हिंचारात झाले आहे. यामध्ये भारताचे २३ जवान शहीद झाले असून ८० जण जखमी आहेत त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या हिंसाचारात चीनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार आहे.

Protected Content