भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजपचे किरीट सोमय्या आणि भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत पोचले आहे. खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार तक्रार आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले असून केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेत घेणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असून या सगळ्यांचा तपास करावा, अशी मागणी करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. भाजपच्या शिष्टमंडळात आ. मिहीर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर आणि विनोद मिश्रा आदींचा समावेश असून केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेत  तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी  म्हटले आहे.

Protected Content