भाजपने ओलीस ठेवलेल्या कॉंग्रेसच्या ४ आमदारांना सोडवून आणण्यात यश : शोभा ओझा

भोपाळ (वृत्तसंस्थ) भारतीय जनता पक्षाने ओलिस ठेवलेल्या मध्य प्रदेशच्या ८ आमदारांपैकी ४ आमदारांना सोडवून आणण्यात यश आल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा यांनी आज दिली आहे.

 

काँग्रेसच्या नेत्या शोभा ओझा एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, भाजप आमचे सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करत आहेत. भाजपने काँग्रेसच्या ८ आमदारांना गुरुग्राम स्थित मनसेरच्या आयटीसी रिसॉर्टमध्ये ओलीस ठेवले होते. त्यातील निम्म्या आमदारांना सोडवून आणण्यात आम्हाला यश आले आहे. भाजपने काही आमदारांना बंगळूरला हलवले आहे, त्यांनाही सोडवून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन कमळ’ सुरु केल्याचा आरोप काँग्रेसने काल केला होता. त्यावर हा काँग्रेसचा अंतर्गत वाद असल्याचे सांगून भाजपने अंग झटकले होते.

Protected Content