बिलाल चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बिलाल चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधात सहा जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पहिल्या गटातील रईस शेख रशीद शेख (वय-२२) रा. मच्छी बाजार, तांबापूरा हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रईस शेख हे मित्रासोबत दुचाकीने मामाच्या मुलाचा साखरपुडाच्या कार्यक्रमाला जात असतांना येथील बबलु उर्फ साजीत असलम कुरेशी याच्या घरासमोरून जात असतांना बबलु याने “गाडी बघून चालव” असे सांगितले. त्यावर “तू तुझे पाहा” असे रईसने सांगितल्याचा राग आल्याने बबलु कुरेशी, इकबाल कुरेशी, शाहरूख कुरेशी आणि शोएब कुरेशी या चौघांनी वखारमधून लाकडी पाट्याने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी रईस शेख यांच्या फिर्यादीवरून बलु कुरेशी, इकबाल कुरेशी, शाहरूख कुरेशी आणि शोएब कुरेशी सर्व रा. बिलाल चौक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील सिरीन बानो रियाज कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिर बबलु उर्फ साजीत असलम कुरेशी हे घरासमोर उभा असतांना रईस खेख रशीद शेख व जुनेद साजीद हे १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दुचाकीने जात असतांना ते दुचाकीवरून घसरले. दोघे खाली पडल्याने त्यांनी उचलण्यासाठी बबलु कुरेशी हा जवळ गेला असता रईसने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दोघांनी वखार मधून लाकडे पाट्या आणून मुलगा शहीद कुरेशी याला बेदम मारहाण केली. तर मुलगा व पती यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सिरीन बानो कुरेशी यांच्या फिर्यादीवरून ईस खेख रशीद शेख व जुनेद साजीद रा. बिलाल चौक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पुढील तपास पोहकॉ नितीन पाटील करीत आहे.

Protected Content