बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले आपारापेठ या गावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्या केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार बाळासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले आपारापेठ येथे काही गुंडांनी बेसावध असलेल्या पाच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकाचे मृत्यू झाला असून अन्य ४ जण गंभीर जखमी आहेत. त्याचबरोबर परभण मध्ये देखील एका शिकलकरी समाजातील तरुणांवर गुंडांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. वारंवार हिंदू समाजावर हल्ले करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे म्हणत. या घटनेच्या निषेधाचे निवेदन सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज तहसीलदार यांना देऊन या संदर्भात त्वरित कारवाई करून संबंधित गुंडांना अटक करावी, महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करावे, व जिहादी मानसिकतेला त्वरित पाय बंद घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी बजरंग दल संयोजक सचिन गायकवाड, संतोष महाजन, धनंजय माळी, चेतन निमाडे, राहुल भोई, सचिन महाजन, परमेश्वर वरखड यांच्यासह बजरंग दल कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content