निर्दयीपणे कोंबलेल्या ११ बैलांची सुटका; दोन जण अटकेत

जळगाव प्रतिनिधी । ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या ११ बैलांना निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारे ट्रक मालक व चालक यांना एमआयडीसी पोलीसांनी  नशिराबाद ते औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळील बसस्थानकाजवळून रात्री १० वाजता अटक केली आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद औरंगाबाद रोडवरून ट्रकमध्ये ११ बैल निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता निशराबाद -औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळ ट्रक क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) ची तपासणी केली असता. त्यात निर्दयीपणे कोंबून विनापरवाना ११ बैल कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे ११ बैलांची सुटका करण्यात आली. तर १ लाख रूपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणा ट्रक चालक आसिफ उस्मान समा (वय-३०) रा. मेहरूण आणि मालक तन्वीर शेख सुपडू (वय-२३) रा. मास्टर कॉलनी यांना अटक केली आहे. याप्रकरणी समाधान पाटील रा. कांचन नगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करत आहे.

ही कारवाई सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रविंद्र चौधरी, हवलदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी केली.

Protected Content