नियम न पाळणारे सुसाट ; कारवाईत नगर परिषद फेल ; केवळ ३०० रुपये वसूल

यावल, प्रतिनिधी । येथील नगर परिषदव्दारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आदी नियम न पाळणाऱ्या नागरीकांकडुन अवघे ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे तहसील कार्यालयात आयोजित तातडीच्या बैठकीत समोर आले. यावर तहसीलदारांनी नाराजी व्यक्त करत नागरपरिषदच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, सध्या संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात प्रशासकीय स्तरावर काही नियम व अटीशर्तीचे आदेश काढलेले आहेत. मात्र, यावल नगर परिषदच्या माध्यमातुन या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासकीय यंत्रणे मध्येच समन्वयाचे आभाव आज यावल येथे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिसून आला. कोरोना विषाणु संसर्गजन्यच्या पार्श्वभुमीवर यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊनच्या काळात कोणकोणते व्यवसाय सुरू ठेवावीत याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, यावल नगर परिषदेकडुन फिजिकल डिस्टन्सिंगपासुन सर्वच नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अखेर तहसीलदार कुवर यांनी या विषयाबाबत तातडीची बैठक घेतली. या बैठकी मुख्यधिकारी हे प्रामुख्याने गैरहजर राहील्याचे दिसुन आले. अशा वेळी तहसीलदार यांनी या लॉक डाऊनच्या ५० दिवसाच्या काळात बेशिस्त व्यवसायीक, सार्वजनिक ठीकाणी व्यवसायाच्या नांवाखाली गोंधळ करणाऱ्या व आदी प्रकारच्या अटीशर्तीचे भंग करणाऱ्या नागरीकांवर किती व कशी दंडात्मक कारवाई केली याची विचारणा नगर परिषदच्या प्रातिनिधींना केली असता त्यांनी चक्क लॉक डाऊनच्या ५० दिवसाच्या कार्यकाळात अवघ्या प्रत्येकी २०० रुपये आणि दुसऱ्या एका व्याक्तीकडुन १०० रुपये प्रमाणे अशी ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे प्रकार समोर आले. यानुसार ६० हजाराच्यावर पहोचलेल्या लोकसंख्येच्या शहरात अनेक दुकाने व व्यवसायीक मंडळीही कुठलेही शासकीय आदेशाला न जुमानता आपले व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत. शहरातील बुरुज चौक , खरेदी विक्री संघ, मेन रोड, बुरुज चौक ते बोरावल गेटपर्यंत जवळपास सर्व दुकाने व व्यवसाय सुरू असल्याने नागरीकांची मोठी गर्दी या मार्गावर शासकिय नियम व फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवितांना दिसुन येत आहेत. नगर परिषद नागरीकांना शिस्त लावण्यात कुचकामी होत असल्याने अखेर या गंभीर विषयावर तहसीलदार यांनी चांगलेच धारेवर धरले आणि त्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोर पालन करण्याच्या सुचना व आदेश दिलेत. या बैठकीस पोलीस निरिक्षक अरूण धनवडे , निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नगर परिषदचे प्रातिनिधी म्हणून वसुली विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड तसेच स्वच्छता विभागाचे प्रमुख शिवानंद कानडे, यावल शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष सलील महाजन, संघाचे सचिन मिस्त्रि उपास्थित होते . दरम्यान नगरपरिषदचे काही कर्मचारी हे दुकानदार व व्यवस्याकांकडुन तसेच लोट गाड्यांवर फळ व भाजीपाला विकण्याऱ्याकडुन कायद्याचा बळगा दाखवुन पैसे उकळीत असल्याचीही ओरड होत आहे.

Protected Content