नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील ५७ वर्षीय शेतकरी गोपीचंद उर्फ गणेश पुंडलिक जाधव यानी नापिकिला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली.

मांडवे येथील शेतकरी गोपीचंद पुंडलिक जाधव (वय ५७) आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी बुधवारी नेहमीप्रमाणे आज सकाळी ६:३० वाजता गेेले होते. दरम्यान त्यांंनी शेतातील झाडाला गळफास घेतला असल्याचे परिसरात बकर्‍या चारनार्‍या गुरार्‍यांना दिसून आले. पोलिस पाटील सागर पाटील यांनी संबंधीत घटनेची पहुर पोलिसांना कळवली. गोपीचंद पुंडलिक जाधव यांंच्यावर तीन लाखांच्यावर कर्ज असून या वर्षी अति पावसामुळे उत्पन्न कमी झाले असल्याने शेतीसाठी घेतलेल कर्ज,मुलाचे लग्नाची समस्या अशा विवंचनेत सापडल्याने नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

जाधव यांच्या पश्‍चात दोन मुले,दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content