जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात दि. २५ डिसेंबर रोजी “हिंदू जनजागृती सभे”तर्फे होणाऱ्या कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणास पायबंद घालण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, दरवर्षी जळगाव शहरात “हिंदू जनजागृती सभे” या संघटनेचे कार्यक्रम सार्वजनिक स्थळावर होत असतात. या सभेमध्ये इतर धर्म व धर्मियांबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे व धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य वक्तांकडून केले जाते. अशा विखारी वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन जळगाव शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या सभेस परवानगी नाकारण्यात यावी ही नम्र विनंती. या सभेस परवानगी दिली व या सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य झाल्यास संबंधित वक्त्यांवर व आयोजकांवर कायदेशिर गुन्हे दाखल करून अशा प्रवृत्तींना पायबंद घालावा. निवेदनावर सुरेंद्र पाटील, सुमित्र अहिरे, राजश्री अहिरे, अम्रिता नेतकर, मुकुंद सपकाळे, अपर्णा निकम, किरण निकम, निलू इंगळे आदींची स्वाक्षरी आहे.