दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना सरकारचा राजीनामा मागण्याचा अधिकार : संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए)वरून घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा व राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार असल्याचे प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, २००४ ते २००८ या कालावधीत दिल्लीत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शिवराज पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. तथापी सरकार जबाबदारी घेत नाहीए. ते यासाठी विरोधकांवर आरोप करत आहेत. दिल्लीतील हिंसचारा हा संवेदनशील मुद्दा आहे. गृह मंत्रालय जबाबदार आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा व राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान असो किंवा गृहमंत्री त्यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Protected Content