दहा राज्यात कोरोनाचा प्रकोप!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात पुन्हा चार दिवसात कोरोना रुग्णांची  संख्या वाढली आहे. दहा राज्यात रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील  स्थिती जाणून घेतली.   उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये   रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत  रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.

 

मागच्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यात  रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल असं सांगण्यात आलं आहे. दहा राज्यातील ८० टक्के  रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यावर राज्य सरकार जोर देत आहे. या जिल्ह्यातील लसीकरण वेगाने केलं जातं आहे.  या भागातील सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. . केरळमध्ये  वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम पाठवली आहे.

 

 

Protected Content