तर देव तुमचं भलं करो. . ! : गुलाबभाऊंचा ठाकरेंना टोला

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज उध्दव ठाकरे यांना जोरदार टोला मारला आहे.

 

रायगड येथील कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या संदर्भात गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या कॉंग्रेसने आम्हा शिवसैनिकांना तुडवलं, ज्या कॉंग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. आधी छगन भुजबळांना फोडलं, मग नारायण राणेंना आणि मग राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांसोबत जाऊन बसला आहात असा खोचक सवालही उपस्थित केला.

 

गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा पक्ष फोडणार्‍यांसोबत उद्धवसाहेब जाऊन बसले आणि आम्हाला गद्दारांच्या रांगेत उभं केलं आहे. पण साहेब आम्ही ४०-४०, ५०-५० खटले आमच्या अंगावर घेऊन ही शिवसेना उभी केली आहे. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बापही चार महिने तुरुंगात राहिला. केवळ शिवसेना हा शब्द खाली जाता कामा नये म्हणून आम्ही बलिदान दिलं, शिवसैनिकांनी बलिदान दिलं. त्या बलिदान देणार्‍या शिवसैनिकांना तुम्ही गद्दार म्हणत असाल आणि या गद्दारांच्या भरवशावर खासदार झालेल्या संजय राऊतला तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो असा उपरोधिक टोला लगावला.

Protected Content