जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील व शिवाजी नगर, गेंदालाल मिल या भागातील गुंड व टवाळखोर लोकांकडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन पैशांची मागणी केली जात आहे. त्यांना पैसे न दिल्यास मारहाण व त्रास देत देण्यात येत आहेत. या टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महानगर)तर्फे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरासह शिवाजी नगर, गेंदालाल मिल या भागातील गुंड प्रवृत्तीचे व टवाळखोर लोक हे दिवसे-दिवसे परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या टू व्हिलर, फोर व्हिलर वाहनधारकांना विनाकारण त्रास देत आहेत. तसेच जाणून-बुजून रात्रीचे वेळेस सदरील लोक मुद्दामहून गाडीचा कट मारुन अपघाताचा बनाव करतात व वाहनधारकांना अडवून त्याचेकडून रुपये १०-१५ हजाराची पैशांची मागणी करतात, तसेच संबंधित पैसे दिले नाही त्याचेजवळचे मोबाईल, किमती वस्तू बळजबरीने हिसकावून घेतात व त्याठिकाणाहून पळ काढतात. संबंधित प्रकार हे दिवसेदिवस मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. तसेच गेंदालाल मिल भागातील मेन रोडवर सुध्दा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे, संबंधित गुंड लोक हे त्याचठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन बसतात व रात्री १२ ते १ वाजेपर्यंत दुकान – चालू ठेवतात. याचा सुध्दा वाहतूकीसाठी व परीसरातील नागरिकांना त्रास होत असतो. तरी संबंधित गुंड व टवाळखोर लोकांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात येऊन परिसरातील येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची होत असलेली लुट तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर युवा महानगर अध्यक्ष रिकू चौधरी, राजू मोरे, भगवान सोनवणे, राहूल टोके, कीरण राजपूत आदीची स्वाक्षरी आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5442638435756715