जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघा भावांना मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांना आठ ते दहा जणांनी लाकडू व दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील माळी गल्लीत घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नितीन रामदास माळी (वय-३१) रा. धनपुष्प कॉलनी, जामनेर येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता नितीन माळी हा त्याचा भाऊ अक्षय माळी सोबत त्याच्या घरी होते. त्यावेळी माळी गल्ली परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल शालिग्राम माळी, गोलू रामदास माळी, कल्पेश रामदास माळी, शालिक दामू माळी, पवन मोरे, निलेश कैकाडी, शिवाजी अशोक माळी, मोहित राजू माळी यासह इतर अनोळखी दोघे जण यांनी नितीन रामदास माळी व अक्षय रामदास माळी या दोघांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. दोघांच्या आई व बहिणींना देखील शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नितीन रामदास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील तपास पोहेकॉ जयंत पगारे करीत आहे.

Protected Content