जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात

*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |* – जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षांना मंगळवार १५ मार्च पासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बसेस व खाजगी वाहने वेळेवर न मिळाल्याने बहुतांश विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिराने पोचले, त्यामुळे विद्यार्थांची केंद्रावर पोचून आरोग्य तपासणीवेळी अनेकांची धांदल तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे. त्याच शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. आज मंगळवारी पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवर स्थानिक स्तरावरील विद्यार्थी मोठ्या उत्साहात पोचले. जिल्ह्यात ७६१ केन्द्रावर ५७ हजाराहून अधिक विद्यार्थी १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत. जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या चार महिन्यापासून एसटी बसेसचा संप सुरु असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णता कोलमडली आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी जसे जमेल तसे मिळेल त्या वाहनाने परीक्षा केंद्र गाठण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून आले.

शहरातील ला.ना. सार्वजनिक विद्यालय, मानवसेवा मंडळ संचलित विद्यालयात विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी तसेच सॅनिटाईझेशन करण्यात येत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी बहुताश विद्यार्थी वेळेत पोचले, तर बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्याना वेळेवर वाहने नसल्याने त्यांच्या दृष्टीने परीक्षाच ठरली.

संसर्ग प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्ष शाळा बंदच होत्या, या कालावधीत सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. संसर्ग प्रादुर्भाव किमी झाल्याने यावर्षी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन न घेता नियमितरित्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाला असल्याची शक्यता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्याची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी, सॅनिटाईझेशन आदी प्रकिया पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी यावर्षी नेहमीप्रमाणे ३ तास परीक्षेच्या वेळेपेक्षा अर्धा तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे.

Protected Content