जिल्हा पेठेतून मध्यरात्री रिक्षाची बॅटरी लांबविली; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा पेठ पोलीसांच्या हद्दीतील अजय कॉलनी परिसरात रिक्षाचालकाच्या रिक्षाची बॅटरी चोरीस गेल्याची घटना रविवार १३ डिसेंबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुनिल सिताराम वानखेडे (वय-४९) रा. अजय कॉलनी, जिल्हा पेठ हे रिक्षाचालक आहे. १२ डिसेंबर रोजी दिवसभर रिक्षा चालवून त्यांनी घरासमोर रात्री ९ वाजेच्या सुमारास रिक्षा लावली. रिक्षा लावल्यानंतर ते जेवण करून झोपले. १३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उठले असता त्यांना रिक्षाची बॅटरीचा लॉक तोडल्याचे दिसून आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना विचारले असता कुणालाही याची माहिती नसल्याचे सांगितले. सुनिल वानखेडे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात २ हजार रूपये किंमतीचा बॅटरी चोरीस गेल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक फिरोज तडवी हे करीत आहेत.

Protected Content