जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा पुरवठा शाखेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून जिल्हा पुरवठा विभागातील चार जणांना रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा पुरवठा शाखेत मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत असल्याची तक्रार कधीपासूनच होती. या पार्श्वभूमिवर, आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास एसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत जिल्हा पुरवठा विभागातील एकूण चार जणांना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात एक महिला कर्मचारी आणि दोन पंटर्सचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(सविस्तर माहिती लवकरच)