जळगाव, प्रतिनिधी ।काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षातर्फे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा दिवस जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला.
देशात सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारने देशाला महागाईच्या दरीत ढकलले असून देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात त अपयशी ठरले आहेत. भारतातील उद्योगधंदे बंद पडले, तरुण बेरोजगार झाले, पेट्रोल डिझेल खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या अशा वेळी देशाला फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच सांभाळू शकते हे सिद्ध झाले आहे. सत्तर वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात किती ही मागणी झाली तरी देशातील काँग्रेस पक्षाच्या सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली व सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले. यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे सरकार आणण्याचा संकल्प आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निश्चय केला असल्याचे जळगाव ग्रामीण तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी सांगितले. जोपर्यंत देशात काँग्रेस पक्षाचे सरकार येणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जमील शेख, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, सचिन माळी, संजय पाटील, सागर कुटुंबळे, समाधान पाटील, पुरुषोत्तम घु,गे अमजद पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/239534620935226