जळगावच्या माहेरवाशीणीचा २५ लाखासाठी छळ; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाटीकाश्रम येथील माहेरवाशीनीचा नवीन प्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे यासाठी छळ केला. पैसे न आणल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील पतीविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, हर्षाली निलेश सुर्यवंशी (वय-२७)  या विवाहितेचे जळगाव शहरातील वाटीकाश्रम परिसरात माहेर आहे. रा. रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील निलेश अशोक सुर्यवंशी यांच्याशी २०१५ मध्ये विवाह झाला आहे. पहिले वर्ष चांगले गेले. त्यानंतर पती निलेश सुर्यवंशी यांनी पुण्यात प्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची पुर्तता न झाल्याने पती निलेश सुर्यवंशी याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणावे यासाठी सासरे अशोक तुकाराम सुर्यवंशी, सासू शोभार अशोक सुर्यवंशी, जेठ चंद्रकांत अशोक सुर्यवंशी, जेठाणी देवयानी चंद्रकांत सुर्यवंशी, मोठे सासरे बळीराम तुकाराम सुर्यवंशी, मोठे सासरे जीवराम तुकाराम सुर्यवंशी सर्व रा. भामलवाडी ता. रावेर, नणंद मनिषा राहूल पाटील, नंदोई राहूल अरूण पाटील रा. पार्वती नगर नाशिक यांनी पतीला पाठबळ दिले. तसेच विवाहितेने पैसे न आणल्यास पतीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहिता एप्रिल २०२० मध्ये माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे. 

Protected Content