चाळीसगावात बाहेरून आलेली विवाहिता बेपत्ता!

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर आलेल्या ४५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील जया दिलीप माने (वय-४५) ह्या विवाहित महिलेची गेल्या पंधरा वर्षांपासून मानसिक स्थितीत बिघाड आहेत. यामुळे तिच्या आईने तिला चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर ४ डिसेंबर रोजी आणल्याने ते येथेच मुक्कामी राहीले. दरम्यान रविवार, ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जया हि लघुशंकेला जाऊन येते असे सांगून गेले. मात्र खूप वेळ झाल्यावरही ती मुळ ठिकाणी परतले नाही. म्हणून तिच्या आईने तिला परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु जया मिळून आले नाही. म्हणून ती हरवल्याची खात्री झाल्याने तिच्या आईच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content