जळगाव प्रतिनिधी । शहरातील गांधी उद्यानाजवळून शतपावली करणाऱ्या रिक्षा चालकाच्या हातातून मोबाईल हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शाहरूख रज्जाक पिंजारी (वय-२८) रा. पांडे चौक जळगाव हे रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हे जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. गांधी उद्यानाकडून पांडे चौकाकडे जात असतांना अज्ञात दोन भामटे दुचाकीने त्यांच्या मागून येवून त्यांच्या हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढला. दोन्ही अज्ञात भामट्यांनी चेहऱ्यावर मास्क आणि जॅकेट घातले होते. याप्रकरणी शाहरूख पिंजारी यांनी मध्यरात्री धाव घेतली. शाहरूख पिंजारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १४ डिसेंबर रेाजी मध्यरात्री २ वाजता अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.